Home यवतमाळ कलाल-कलार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची फाईल रखडली; समाजात नाराजीचा सूर

कलाल-कलार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची फाईल रखडली; समाजात नाराजीचा सूर

59

कलाल-कलार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाची फाईल रखडली; समाजात नाराजीचा सूर

राज्यात अनेक समाजांना आर्थिक विकासासाठी महामंडळ स्थापन करून मदत केली जात असताना महाराष्ट्र कलाल-कलार समाजाचे आर्थिक विकास महामंडळ मात्र अद्यापही अडथळ्यांमध्ये अडकले आहे. या विषयावर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कलाल-कलार समाजाच्या वतीने भगवान सहस्त्रार्जुन यांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्याची मागणी सरकारदरबारी अनेकवेळा करण्यात आली. यासंबंधी शासन दरबारी पाठपुरावा करूनही अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. समाजाच्या भावना लक्षात घेता, तत्काळ निर्णय घेणे आवश्यक असून फाईल कुठे अडली आहे हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

समाजातील नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आर्थिक महामंडळाची गरज समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. कलाल-कलार समाज अनेक पिढ्यांपासून मागासलेल्या अवस्थेत असून शिक्षण, रोजगार, उद्यमिता यामध्ये मागे पडलेला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक पाठबळ हा विकासाचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, मुख्यमंत्री यांना भेटून यासंदर्भात निवेदने देण्यात आली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. “भविष्यातील निवडणुकांमध्ये आम्ही आमचा विचार नक्कीच बदलू” असा इशाराही समाजबांधवांकडून दिला जात आहे.

महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या माननीय जिल्हाधिकारी यांना यवतमाळच्या वतीने निवेदने दिले आहे. परंतु या सरकारने आमच्या निवेदनांचा विचार केलेला नाही म्हणून कृपया या निवेदनाचा विचार करून सहस्त्रबाहु अर्जुन आर्थिक विकास महामंडळ देण्याची कृपा करावी अशी मागणी महाराष्ट्र कलार कलाल समाज संघटना यवतमाळच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन मेश्राम. अमरावती यवतमाळ विभागीय अध्यक्ष डॉक्टर गणेश नाईक. व यवतमाळ जिल्हा संघटक गणेश कोसरकर यांनी सरकारला विनंती केले . आम्ही ही मागणी वारंवार करत स्पष्ट केले की, “२०१५ पासून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत, मात्र अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. सरकारने त्वरित निर्णय घेऊन आमच्या न्यायहक्काची पूर्तता करावी. नाहीतर आम्हाला कठोर पाऊल उचलावे लागेल या मागणीकरिता महाराष्ट्रातील सर्व कलार कलार समाज संघटनेचे वतीने तसेच यवतमाळच्या वतीने डॉक्टर गणेश नाईक, राजेंद्र शेंडे , गणेश कोसरकर ,सुरेश पटले, नितीन मेश्राम, शामरावजी कावरे ,नितीन उके, राजू मानकर, सचिन कावरे, सचिन सुरसावुत, योगेश मेश्राम, अजित कोसरकर, दिनेश सागरे, तुळशीदास देशमुख, चिराग कोसरकर, अभी शेंडे रोहित कोसरकर, सागर पटले, कूणतीलाल उके, बाळू मेश्राम राजेश सुरसाउथ.

Copyright ©