अखेर सुमित्राने कॅबिनेट मंत्र्या समोर जिल्हा अधिकारी कार्यालयात केला आत्मदहनाचा प्रयत्न
पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आत्मदहनाचा प्रयत्न!
वाई ( रुई ) येथील अन्यायग्रस्त महिलेने अमृत महोत्सवी चक्क जिल्हा अधिकारी कार्यालयात नामदार संजय राठोड यांच्या समक्ष जाऊनआत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे
सवी.
असे की वाई ( रुई ) येथील विधवा,निराधार माय लेकिवर नाही मागील दहा वर्षा पूर्वी पासुन अन्याय होत असल्याने ती त्रस्त झाली होती सन.२०१२ पासुन तिचे घरकुल यादीत नाव येत होते मात्र ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी तिला घरकुलाचा लाभ काही मिळू दिला नाहि एकटी काय करणार आणि तिची बाजु घेणारे चार हजार लोकांमधून आज पर्यंत कुणीही पुढे यायला तयार नव्हते तिने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न हि केला त्या वेळीमात्र वारकरी मंडळातील सुनील टाले यांनी तिला वाचविण्यात यश मिळवल्याने तिला धीर देत तिला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला तिला बी.पी. एल.चे कार्ड आहे अंतोदय मध्ये बसून सुद्धा तिला मागील चार वर्षा पासून सरकारी स्वस्त धान्यदुकानदार यांनी धान्य हि देण्यास मनाई केली तर सिलेंडर मध्ये नंबर लागला परंतु ते सिलेंडर तिला न देता दुसऱ्याला दिले,जसे हिंदी चित्रपटात पहावयास मिळते त्या पेक्षाही यवतमाळ तालुक्यातील वाई या गावात जिवंत बोलके उदाहरण पहावयास मिळत आहे विशेष म्हणजे याच जिल्ह्यात तीन मंत्री होते,सहा आमदार दोन खासदार तरी एका असाह्य महिलेवर अत्याचारात वाढ,कुठे आहे त्या संघटना ज्या अत्याचार विरोधी म्हणून ढोल पिटत असतात,हि एक जिल्ह्यातील दुःखद घटना आहे, घरकुलांच्या प्रत्येक गावा गावात घटना पहावयास मिळत आहे मात्र या कडे कुणाचेही लक्ष नाही विशेष म्हणजे सर्व सामान्यांच्या समस्याची दखल घेण्यास कुणालाही वेळ नाही,अशा अनेक सुमित्रा गाव खेड्यात पहावयास मिळते, म्हणून अशा अप्रिय घटना समोर येत आहे सुमित्रा चे उदाहरण घ्यायचे झाल्यास तिने ११ ऑगस्ट ला जिल्हा अधिकारी यांचे कडे निवेदन दिले होते की माझं घरकुल मला दोन दिवसात द्या ! मात्र जिल्हा अधिकारी यांनी निवेदन उघडूनही पाहिले नाही,ते जर पाहिले असते तर तिला आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली नसती,या अगोदरही अशाच दुर्लक्षामुळे एका वीस वर्षीय आदिवासी तरुणीने जिल्हा अधिकारी कार्यालयातच पेट्रोल अंगावर घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.हि घटना ३ डिसेंबर २१ ला घडली त्या वेळीही तिच्या तक्रारीची दखल कोणत्याच अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती , जो पर्यंत अधिकारी सक्षम होणार नाही तो पर्यंत असे प्रकार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे प्रत्येक गावातील घरकुल यादी मध्ये झालेल्या गैर प्रकारची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. जो पर्यंत कारवाई होणार नाही तो पर्यंत गैर प्रकार थांबणार नसल्याचेही मत वेक्त करन्यात येत आहे.सुवर्ण महोत्सवी घडलेल्या निंदनीय प्रकारावर नामदार संजय राठोड यांनी संबधी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याचे गटविकास अधिकारी यांना आदेश दिल्याचे समजते! ना.संजय राठोड पुढे काय कारवाई करतील या कडे जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे.
