यवतमाळ तालुक्यातील भांब (राजा) येथील राष्ट्रीय महामार्ग अनेक त्रुटी करून पूर्ण केला या मार्गाने अनेक शेतकरी ग्रामस्थ त्रस्त झाले आहे रस्ता तर बनविला परंतु गावालगत नाल्या उंच केल्या त्या मुळे नाल्यात पाणी न जाता रस्तानी तर अनेकांच्या सरळ घरात शिरत आहे या मुळे अनेक शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे या बाबत संबंधित विभागाला जिल्हा अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना शेकडो निवेदने दिले,अखेर राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलनहि केले मात्र प्रशासनाला घाम हि आला नाहि आणि समस्या तर सुटल्याच नाही परंतु हक्क मागणाऱ्या सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांन वर गुन्हे मात्र दाखल केले त्या आजही समस्या कायमच आहे ना नाली केली ना समस्या निकाली लागली ,अनेक शेतकर्यांचा शेतात पाणी जाते अनेकांचे नुकसान होत आहे शेतात जायला रस्ते नाही त्या मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे या गंभीर समश्याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी सरपंच अनुप्रिया सुनील डिवरे यांनी केली आहे
