सुवर्ण महोत्सवी सुमित्रा करणार आत्मदहन.
विधवा, निराधार, सुमित्राला घरकुलां पासून ठेवले वंचित
यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत वाई (रुई ) येथील महिला मागील दहा वर्षा पासुन शासनाच्या योजना पासुन आजही वंचित जणू काही शासनाच्या योजने पासून वाळीत टाकले असल्याचे उदाहरण वाई येथे पहावयास मिळत आहे संन २००२ मध्ये झालेल्या सर्वेत सुमित्रा बनसोड यांचे नाव आले २०१२ मध्ये सतत घरकुल यादीत नाव यायचे ग्रामपंचायीतर्फे करणे सांगून सुमित्रा ला आलेले घरकुल आपली आर्थिक पोळी शिजऊन तिचे घरकुल दुसऱ्याला द्यायचे हा प्रकार ग्रामपंचायत कडून सतत सुरू ठेवला मागील दोन वर्षा पूर्वी पुनः यादीत नाव आले,परंतु ग्रामसेवकांनी लाभार्थ्याला म्हणजेच सुमित्रा ला सांगितले की तुझ्या घरी सौछ्याल्य नसल्यामुळे तुम्हाला घरकुल मिळू शकत नाही,तर तिने अंगावरील असलेले दागिने विकले तर महिला बचत गटातील कर्ज उचलले आणि सौछ्यालय बांधले मात्र तिथेही तिला डायाळून तिचे आलेले घरकुल दुसऱ्याला दिले हे इथेच थांबले नाही तर तिला स्वस्त धान्य दुकान मधून मिळणारे धान्यही बंद केले कोरोणा काळात मोफत मिळणारे धान्य तर मिळालंच नाही परंतु राशन कार्ड वरील हक्काचे धान्य हि बंद झाले म्हणून तेही धान्य बंद करण्यात आल्याचं भयावह प्रकार या महीले सोबत घडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. सुमित्रा हि आपल्या ७५ वयोवृध्द आईचा धूने भांडी करून सांभाळ करीत स्वत:चाही कसा बसा उदरनिर्वाह करीत आहे कुडाचे असलेल्या घरात राणाऱ्या सुमित्राचे घर सतत धार पावसाने जमीनदोस झाल्याने ह्या माय लेकी उघड्यावर आल्याने आता तर यांच्या डोक्यावरील छत च गेले तर यांनी राहावं कुठे असा गंभीर प्रस्न या मायलेकी समोर उभा राहिल्याने शेवटचा पर्याय म्हणून अखेर जिल्हा अधिकारी यांचे कडे तक्रार दाखल केली जर दोन दिवसात हा प्रस्न सुटला नाही तर सुवर्ण महोत्सवी आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
