Home यवतमाळ भारतीय लोकशाही मध्ये मानवी मुल्याची योग्य अमलबजावनी होणे महत्वाचे आहे. – मधुसुदन...

भारतीय लोकशाही मध्ये मानवी मुल्याची योग्य अमलबजावनी होणे महत्वाचे आहे. – मधुसुदन कोवे

12

भारतीय लोकशाही मध्ये सार्वभौम समाज व्यवस्था आहे अनेक धर्म पंथ पंरपरा आणि विविध संस्कृति चे चित्र आपल्या ला दिसुन येत आहे परंतु ह्या संस्कृति पंरपरा मध्ये परिवर्तन झालेली दिसुन येत आहे यात संस्कृति लोप पावत आहे ही भिती सर्व समाजातिल घटकातील लोका मध्ये दिसुन येत आहे

या परस्थिती मध्ये लोकसंख्या प्रमाण आंतर राष्ट्रीय विचार प्रवाह जागतिकीकरण खाजगीकरण असे विविध प्रवाह भारतीय समाज व्यवस्थेवर परीनाम करत आहे.या सर्व बाबीला सरकार जबाबदार आहे आम्ही यांत्रिकी करणाला विशेष महत्व देत आहो.ह्या मुळे बेरोजगारी चे प्रणाम मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे आजच्या परस्थिती मध्ये देशाचं विभक्ती करण करणे अतिशय महत्वपूर्ण आहे.छोटी छोटी राज्य निर्माण करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय विकासाची धोरण:-
“देश छोटा विकास मोठा”
राष्ट्रीय धोरण आपन तपासली पाहिजे:-
“राज्य छोटी प्रगती मोठी”
आज भारतीय लोकशाही मध्ये असे धोरण महत्वाचे आहे आणि असे निर्णय लोकशाही मध्ये समाजाभिमुख लोकाभिमुख आहे. या साठी भारत सरकार ने आपली भुमिका स्पष्ट केली पाहिजे.

भारतीय संस्कृती सक्षम ठेवण्यासाठी संत विचाराची परंपरा आणि कृषि प्रधान देशासाठी शेतकरी हा जगाचा पोशिंदा समजुन बळीराजा चा देश समजुन शेतक-यासाठी अग्रक्रम दिला पाहीजे.पण असे होताना दिसुन येत नाही ही चुक सरकार ची आहे.याला सरकार जबाबदार आहे.

भारतीय संविधान यांची मुलतत्व स्विकारत असतात समता स्वातंत्र्य बंधुता यांची योग्य अमलबजावनी होताना दिसुन येत नाही हे आमच्या देशाचं दुर्देैव आहे देशात सामाजिकता आहे की नाही आता शंका निर्माण होत आहे म्हणजे लोकांचा विश्वास सरकार वरुण उडत आहे म्हणुन सरकार ने देशात सामाजिकता जोपसण्या साठी संत विचाराची परंपरा साहित्यिक आणि विचारवंत लेखक कवी इतिहासकार आणि संशोधक शास्त्रज्ञ यांच्या कार्याची दखल देण्यासाठी राष्ट्रीय स्तरा पासुन तर ग्राम स्थळा पर्यंत विचार केंद्र निर्माण करण्यासाठी भारत सरकार ने प्रयत्न केले पाहिजे

प्रश्न गंभीर आहे प्रयत्न सामाजिक विचाराची मानसं आहे यांनी सरकार च्या लक्षात आणुन दिले पाहिजे थोर नेते राष्ट्रसंत यांचा विषयावर सरकार ने राजकारण करु नये राजकीय पक्ष हा देशासाठी सामाजिक सेवा करण्यासाठी निर्माण झाला आहे देशाचे पुढारी राजकीय नेते यानी देशाचे सेवक म्हणुन कार्य करण्यासाठी पुढे आले पाहिजे सरकार अशा अनेक विषयावर एक सुत्री कार्यक्रम निर्माण करुण सर्वांनी या विचाराची अमलबजावनी गावा पासुन तर देशासाठी केली पाहिजे तरच या देशाची राष्ट्रीय मुल्याची जोपासना होईल असे स्पष्ट मत मधुसुदन कोवे गुरुजी यानी व्यक्त केले

Copyright ©